सध्या समस्त समाज जातीचे लेबल चिटकवून,धर्माचा मुखवटा घालून मिरवत आहे. माणसाने माणसात माणूसपण शोधणे थांबवलेले आहे तो आता फक्त पाहतोय ती जात...! तो पाहतोय धर्म,तो पाहतोय फक्त भाषा...,प्रेम ही ईश्वराची देणगी आहे. निव्वळ प्रेमानेच माणूस माणसात राहणार आहे, घरातील एकोपा,नात्यातील एकोपा,समाजातील, देशातील जगातील एकोपा हा केवळ आणि केवळ या प्रेमामुळेच शक्य आहे हे तो विसरला आहे....
याची जाण करून देण्याचा प्रयत्न म्हणजे मणी रत्नम यांचा 1995 साली प्रदर्शित झालेला बॉम्बे हा चित्रपट. चित्रपट संपूर्ण देशातील जनतेने डोक्यावर घेतला खरा पण मनात उतरवून नाही घेतला याचीच खंत...

Comments
Post a Comment